स्त्री पुरुष समानता निबंध मराठी | stri purush Samanta essay in Marathi |KhupMarathi
नमस्कार मित्रांनो आजच्या निबंधात आपण आधुनिक जगातील स्त्री पुरूष यांच्यामध्ये काय बेत आहे हे आपण जाणून घेणार आहोत. खरंच स्त्री-पुरुषांना समानता अधिकार सुद्धा आहेत का हे सुद्धा आपण जाणून घेऊ. स्त्री पुरुष समानता हा एक वैचारिक निबंध प्रकार आहे. ते आपण सरळ भाषेत आणि ते चांगल्या प्रकारे कशी मांडणी करता येईल हे खालील प्रमाणे बघूया. अशी आशा करतो की तुम्हाला लिहिलेला निबंध आवडेल.
स्त्री पुरुष समानता निबंध मराठी | stri Purus Samanta essay in marathi
सध्याच्या युगात बहुतेक लोक असे म्हणतात की एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. याचा अर्थ असा होतो की स्त्रीला पुरुषाची गरज आणि पुरुषाला स्त्रीची गरज असते. जसे की पतंग दोरा शिवाय उडू शकत नाही, म्हणजेच जा पतंग हवेतून तुटला की त्या तुटलेल्या पतंगाचा काही अर्थ राहत नाही म्हणून जर स्त्री पुरूष वेगवेगळे असतील तर त्यांचे सांसारिक जीवन सुद्धा स्थिरपणे चालू शकत नाही. आणि समाजात एका स्त्रीला जेवढे महत्त्व नसते तेवढे महत्त्व त्याला लग्नानंतर एका पुरुषासोबत असल्यावर त्याचे महत्त्व वाढते. जर एका स्त्रीचे का पुरुषासोबत लग्न झाले आणि त्यानंतर काही कारणास्तव त्या पुरुषाचा पुरुषाचे मृत्यू झाले. तर त्या स्त्रीच्या सुद्धा समाजात महत्त्व कमी होऊन जाते तसेच समाजातील काही लोक त्याच्याकडे वाईट नजरेने बघतात. यावरून आपल्याला असं समजतं की स्त्री-पुरुष एकमेकांशी अवलंबून आहे.
जुन्या काळात स्त्री व पुरुष यांच्यामध्ये समानता नव्हती. जुन्या काळी स्त्रीने चूल आणि मूल सांभाळत असे. पुरुषांना असे वाटते की चूल आणि मूल सांभाळणाऱ्या स्त्रियांना निर्णय घेण्याची क्षमता नाही असे वाटत असे. आपल्या भारतीय संविधानानुसार सुद्धा स्त्री आणि पुरुष यामध्ये काहीही भेद नसून सर्वांमध्ये एकिपणा आहे.
वैचारिक निबंध मराठी विषय
स्वातंत्र्यपूर्व भारतामध्ये पहिले स्त्रिया फक्त आपल्या घरामध्ये असायच्या कारण त्यांना पूर्णपणे स्वतंत्र समानता स्वातंत्र्य नव्हते. फक्त ते आणि घरातले कामच करत असत. पण भारताच्या स्वातंत्र्यानंतर आणि त्यात मोठ्या प्रमाणात विविध आणि विविध क्षेत्रात स्त्रीने आपली चांगलीच कामगिरी बजावली आहे. यावरून प्रत्येक स्त्रीला शिकायला मिळते की कोणती स्त्री कोणत्या पुरुषापेक्षा कमी नाही. कल्पना चावला ही स्वतःच्या हिंमतीने, जिद्दीने आणि कष्टाने तिने तिचे स्वप्न स्वतः पूर्ण केले, पण एवढे अवघड काळामध्ये कोणी सोबत नसताना आणि स्वतःची जीवाची जीवाची पर्वा न करता त्यांनी देशा मध्ये स्वतःचे नाव मोठे केले.
विविध ठिकाणी आत्ता स्त्रिया बरोबरीने कार्य करत आहे. आणि काही क्षेत्रांमध्ये स्त्रियांनासुद्धा पुरुषांपेक्षा जास्त कार्य केले आहेत. तरीही काही छोट्या मोठ्या गावांत अत्याचार केले जात आहे. तरीपण ते या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला त्याला घाबरत नाही.
आजची स्त्री आपल्या भारताच्या बाहेर सुद्धा आपले नाव उज्वल करत आहे. आपण काही स्त्रियांकडून खूप काही शिकू शकतो. जसा की आयपीएस किरण बेदी यांच्याकडून चांगल्या प्रकारे व्यवस्थापन कसं करायला पाहिजे, आणि कोणत्याही समस्येला सामोरे कसे जावे यांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने शिकवले आहे. आजच्या परिस्थितीमध्ये सरकारसुद्धा स्त्रियांना पाठीमागे येत आहे. आणि आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी आपल्या सर्वांना असे सांगितले आहे की आपण सर्वांनी आत्मनिर्भर बनावे. आणि या योजनेला स्त्रिया भरपूर प्रमाणात आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करत आहे.
आपल्या समाजात काही स्त्रिया आत्म निर्भर पूर्णपणे आत्मनिर्माण निर्भर झालेले आहेत. ते पण एक दम सुखाने आणि सुरक्षितपणे जगत आहे. तर आपण असं म्हणत असले तरी पण चालेल , ही सध्या स्त्री पुरुष समानता आपल्या सारखेच आहे.
0 Comments